शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

१२ हेक्टर क्षेत्रात ७ हजार २०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:50 IST

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : ...

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : वनविभागामार्फत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवथर येथील रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यातआला.यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, शिवथरच्या सरपंच मीना गुरव आदी उपस्थित होते.शिवथर येथील वनविभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रात रविवारी सकाळपासून ७ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आवळा, चिंच आदी वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रांरभी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. त्यानंतर ते म्हणाले, ‘२०१८ च्या पावसाळ्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे सातारा जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये १३ लाख २५ हजार वन विभागाचे उद्दिष्ट असून, वन विभागाकडून १७ लाखवृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला, गायरानानवर, गावठणात वृक्ष लागवड करावी आणि प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करून संवर्धन करावे, असे आवाहनही अंनजकर यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास शिवथर येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.